गंभीर पूर परिस्थितीतही राष्ट्रीय लोक अदालतीस भरघोस प्रतिसाद
schedule27 Jul 24 person by visibility 99 categoryकोल्हापूर

एकूण २६८३ प्रलंबित प्रकरणे व २५,०७७ दाखलपूर्व प्रकरणे सामोपचाराने निकाली काढण्यात आली. सकाळी १०-३० वाजता मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती कविता अग्रवाल यांनी लोकन्यायालयाचे उद्घाटन केले.
या लोकन्यायालयात मोटार वाहन अपघात प्रकरणात एकूण ६,१०,१९,१९९/- (सहा कोटी, दहा लाख, एकोणीस हजार, एकशे नळ्याण्णव) रक्कम रूपये अपघातातील जखमींना अथवा मयताच्या वारसांना नुकसान भरपाई म्हणून तडजोडीमार्फत विमा कंपनीकडून देण्यात आले. या लोकन्यायालयाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती कविता अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व न्यायाधीश, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, प्रसाद एन. देशपांडे, अधिक्षक राजेंद्र सोनुले व इतर कर्मचा-यांनी काम पाहिले. या लोकन्यायालयास वकील संघाचे पदाधिकारी, परिवहन आधिकारी, शहर वाहतूक शाखेचे पोलीस, सर्व पोलीस ठाण्याचे कर्मचारी, विमा कंपन्या, बँका, वित्तीय संस्था, गटविकास अधिकारी, कोल्हापूर महानगरपालिका, विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.
या प्रसंगी जिल्हा न्यायाधीश श्रीमती पी.एफ. सय्यद, डी. व्ही. कश्यप, एस.एस. तांबे, एस.पी. गोंधळेकर, श्रीमती ए.एस. वाईकर तसेच इतर न्यायाधीश आणि जिल्हा वकील संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.